मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
राज्याचा कारभार हाती घेताच देवेंद्र फडणवीस सरकारने विविध समस्यांनी ग्रासलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याचे संकेत दिल्यानंतर आज सरकारने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गावर या मेट्रो धावणार असून त्यामुळे मुंबई खऱ्या अर्थाने 'मेट्रो सिटी' होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रोबरोबरच वांद्रे-कुर्ला जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अशा असतील नव्या मेट्रो
O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही मेट्रो तब्बल ४० किलोमीटरचा प्रवास करेल. या मेट्रो मार्गावर ३६ स्थानके असतील व हा मार्ग पूर्णत: भुयारी असेल.
O वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली हा मेट्रो मार्ग ३२ किलोमीटरचा असून त्यावरील २४ स्थानके भुयारी असतील तर ६ उन्नत (एलिव्हेटेड) असतील.
O दोन्ही मेट्रोचे काम मुंबई मेट्रो रेल महामंडळाद्वारे ६-७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी येणारा अंदाजित खर्च २५ हजार कोटी रूपये एवढा, तर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गासाठी १९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.
O मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारली जाईल. उर्वरीत ५० टक्के खर्च केंद्र आणि राज्य सरकार किंवा प्राधिकरणातर्फे करण्यात येईल.
वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर
वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर दररोज गर्दीच्या वेळी तासाला सरासरी १२ हजार वाहने गर्दी करतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले. यावर उपाय म्हणून ४ उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्यात येणार आहे.
O प्रस्तावित चार उड्डाणपुलांपैकी दोन उड्डाणपूल वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंक आणि सी-लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल असे दुपदरी असतील. तिसरा धारावीकडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणारा तर चौथा कलानगर जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारा असेल. हे पूल तीन पदरी असतील.
O धारावीकडून सी-लिंककडे जाणारी वाहतूक अव्याहत ठेवण्यासाठी सरकारी जमिनीवरून ३०० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २२७ कोटी रुपये आहे.
राज्याचा कारभार हाती घेताच देवेंद्र फडणवीस सरकारने विविध समस्यांनी ग्रासलेल्या मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईसाठी स्वतंत्र सीईओ नेमण्याचे संकेत दिल्यानंतर आज सरकारने वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी दिली. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गावर या मेट्रो धावणार असून त्यामुळे मुंबई खऱ्या अर्थाने 'मेट्रो सिटी' होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मेट्रोबरोबरच वांद्रे-कुर्ला जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला.
अशा असतील नव्या मेट्रो
O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द ही मेट्रो तब्बल ४० किलोमीटरचा प्रवास करेल. या मेट्रो मार्गावर ३६ स्थानके असतील व हा मार्ग पूर्णत: भुयारी असेल.
O वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली हा मेट्रो मार्ग ३२ किलोमीटरचा असून त्यावरील २४ स्थानके भुयारी असतील तर ६ उन्नत (एलिव्हेटेड) असतील.
O दोन्ही मेट्रोचे काम मुंबई मेट्रो रेल महामंडळाद्वारे ६-७ वर्षांत पूर्ण करण्यात येईल.
O दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी येणारा अंदाजित खर्च २५ हजार कोटी रूपये एवढा, तर वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली मार्गासाठी १९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे.
O मेट्रो प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी ५० टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने उभारली जाईल. उर्वरीत ५० टक्के खर्च केंद्र आणि राज्य सरकार किंवा प्राधिकरणातर्फे करण्यात येईल.
वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर
वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर दररोज गर्दीच्या वेळी तासाला सरासरी १२ हजार वाहने गर्दी करतात, असे एका सर्वेक्षणात दिसून आले. यावर उपाय म्हणून ४ उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्यात येणार आहे.
O प्रस्तावित चार उड्डाणपुलांपैकी दोन उड्डाणपूल वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंक आणि सी-लिंक ते वांद्रे-कुर्ला संकुल असे दुपदरी असतील. तिसरा धारावीकडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणारा तर चौथा कलानगर जंक्शन येथून पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने जाणारा असेल. हे पूल तीन पदरी असतील.
O धारावीकडून सी-लिंककडे जाणारी वाहतूक अव्याहत ठेवण्यासाठी सरकारी जमिनीवरून ३०० मीटर लांबीचा व १२ मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च २२७ कोटी रुपये आहे.
No comments:
Post a Comment